Saturday, February 23, 2019

पुलवामातील भ्याड हल्ल्यात-नील


पुलवामातल्या भ्याड हल्यात 

हुतात्मा झाले चाळीस जवान 
पेपरात, न्यूजमध्ये बातम्याच बातम्या 
कोण बघतंय कालचं हवामान?ll१ll

शहीद झालेले जवान ते 
नव्हते फक्त सैनिक बरं 
गोरगरीबांची, शेतकऱ्यांची 
मुलं ती हेच खरं ll२ll

सर्वत्र पसरला रागच राग 
भय, क्रोध, शोक अनावर 
मुलगा होता, नवरा होता 
होता तो सैनिक निडर ll३ll

पाकिस्तानचे झेंडे जाळले 
बिलकुल आवरत नव्हता संताप 
पाकिस्तानला उत्तर द्यायला 
एकत्र झाले भाजपा, आप ll४ll

समाजामध्ये तयार झाली 
तीन मतं निरनिराळी 
एक म्हणाले युद्ध करण्याची 
आता आहे आपली पाळी ll५ll

दुसरं मत सरकार विरोधी 
सरकारलाच प्रश्न विचारायला आलं 
दहशतवाद्यांना हिंदुस्तानामध्ये 
येणं कसं शक्य झालं? ll६ll

तिसरं मत अगदीच वेगळं 
म्हणालं आम्हालाही वाटते 
खंत शांतता पाळू सगळेच जण 
युद्ध नको, हवा बुद्ध ll७ll

जैश-ए-महंमदने 
स्वीकारली हल्याची जबाबदारी 
जम्मू- काश्मीर, पाटणातल्या 
लोकांना हवीये मारामारी? ll८ll

जागोजागी, शाळांमध्ये 
नागरिकांनी वाहिली श्रद्धांजली 
पेटून उठले सशस्त्र सैनिक 
शत्रू निवारणाची तयारी झालीll९ll

लष्कराला मिळाले सर्वाधिकार 
समाजात मात्र शोकच शोक 
हुतात्म्यांच्या कुटुंबाच्या हृदयात 
पडलं होतं दुःखामुळे भोक ll१०ll

सगळेच म्हणत होते, 
पाकिस्तानशी लढताना आनंदात मरू 
खोडकर, लहानशी मुलं आम्ही 
सांगा बरं आम्ही काय करू? ll११॥

नील अर्चीस मनीष

सहावी 

धन्यवाद!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#मराठीभाषादिन

No comments:

Post a Comment

काव्यलेखन भाग१

*नमस्कार,* *२७ फेब्रुवारी,मराठी भाषा दिन* हा जगभरातील मराठी भाषकांकडून दरवर्षी साजरा केला जातो. ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त प्रसिद्ध मराठी *कव...